नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई- आग्रा महामार्गावर विल्होळी जवळ आल्टोच्या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
रविवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाल्याचे समजते. नाशिककडून मुंबईकडे जाणा-या अज्ञात वाहनाने विल्होळी जैनमंदिर जवळ अल्टो कारला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघात आल्टो कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. यात आशाबाई तानाजी सहाने (५५), मंदाबाई निवृत्ती कोकणे (४६), तानाजी गोविंद सहाने (४३), मेघा प्रदिप सहाणे (२५), मनस्वी प्रदिप सहाने (३), प्रदिप सहाने (४३), दिदी विनोद सहाने (१३), साहिल विनोद सिरसाट (१२) रा. आंबे बहुला, नाशिक ही जखमींची नावे आहे.
या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका लगेचच अपघातस्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना तात्काळ खासगी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790