नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील किमान तापमानातील घसरण कायम आहे. रविवारी धुळे येथे राज्यातील सर्वात नीचांकी ८ किमान तापमानाची नोंद करण्यात आली.
नाशिकमध्ये सोमवारी (दि. २५ डिसेंबर) किमान १२.५ तर निफाडमध्ये कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ८.७ इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
२९ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान पुन्हा नव्याने पश्चिमी चक्रवात हा हिमालयावर धडकणार असल्याने उत्तरेकडून येणारे वारे आणि थंडीचा कडाका हा कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात कोकण वगळता उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान घसरले असून मराठवाड्यातदेखील छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यांत रविवारी थंडीचा कडाका जाणवत होता. कमाल तापमानदेखील सरासरीइतके झाल्याने दिवसाही वातावरणात थंडी जाणवत होती.
कोकण वगळता उर्वरित राज्यात थंडी:
महाराष्ट्रात कोकण वगळता उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान घसरले आहे. तर मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यांत रविवारी थंडीचा कडाका जाणवत होता. कमाल तापमान देखील सरासरी इतके झाल्याने दिवसाही वातावरणात थंडी जाणवत हाेती.
मुंबई आणि ठाण्यातही थंडी वाढली:
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यातही थंडी वाढली आहे. शहरात थंड वारे वाहत असल्याने पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. रविवारी महाबळेश्वरमध्ये 15 अंश तापमानाची नोंद झाली. मुंबईत पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्याशिवाय नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातही तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.