नाशिक: शहरातील शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना शिधापत्रिकाधारकांनी शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांची ई-केवायसी नजीकच्या रास्तभाव दुकानदारांशी संपर्क साधून ई-पॉज मशीनवर Biometric Authetication द्वारे पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी कैलास पवार व धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बीएसएनएल केबल चोरी प्रकरणात मोठा पर्दाफाश; मुंबईतून २.८८ कोटींचा मुद्देमाल जप्त, ६ अटकेत

रेशन कार्डमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक असून, ज्या सदस्यांची ई-केवायसी विहित मुदतीत पूर्ण होणार नाही त्यांचा अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे. तसेच ज्या वयोवृद्ध लाभार्थांचे अंगठ्याचे ठसे व आयआरएस स्कॅन होणार नाही, अशा लाभार्थ्यांची यादी कार्यालयात सादर करून त्या लाभार्थ्यांचे धान्य सुरू ठेवावे.

🔎 हे वाचलं का?:  मान्सून लांबला? नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

याबाबत शासनस्तरावरून पुढील आदेश पारित करण्यात येणार आहेत. तसेच ज्या लहान मुलांचे ई-केवायसी होणार नाही, अशा पालकांनी लहान मुलांचे कार्ड हे आधार केंद्रावरून अद्ययावत करून त्यानंतर ई-केवायसी करावी. लहान मुलांची ई-केवायसी होईपर्यंत धान्याचा लाभ बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790