नाशिक: रेशन कार्डसाठी ई-केवायसी; ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नाशिक। दि. ३ ऑगस्ट २०२५: धान्य शिधापत्रिकाधारकांना मोफत मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत जिल्ह्यातील सुमारे १५.८१% लाभार्थी अद्यापही ई-केवायसी पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या रेशनवरील धान्य मिळवण्याबाबत मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आता ५ ऑगस्टपर्यंत दुकानदारांना शिल्लक नागरिकांची ई-केवायसी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय, ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढीची शक्यता वर्तवली जात असल्याने, या सुमारे १६% गरीब नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक परिक्रमा मार्गासाठी वरवंडी येथील खरेदी प्रक्रिया पूर्ण- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

शासनाने दिलेल्या ३१ जुलैच्या मुदतीत जिल्ह्यातील ८४.१९% नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुरुवातीला, ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांनाच धान्य दिले जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु, शिल्लक राहिलेले लाभार्थीही गरीब असल्याने, शासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेत ५ ऑगस्टपर्यंत यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महावितरणतर्फे शहरात तक्रार निवारणासाठी विविध संपर्क क्रमांक जारी

नाशिक जिल्ह्यातील ई-केवायसी प्रक्रियेचे एकूण लक्ष्य ३८,६१, २६९ आहे. सद्यस्थितीत २०, २०, ३१३ नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर १२, २६,६३९ नागरिकांची ई-केवायसी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचप्रमाणे, ६,१४,१५५ नागरिकांची अद्याप ई-केवायसी झालेली नाही.

राज्यात २५% लाभार्थीचे ई-केवायसी बाकी:
राज्यातही हेच प्रमाण कायम असून, राज्यात सुमारे २५% नागरिकांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे. त्यामुळे, मुदतवाढ देण्यासह त्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790