“ही” रेल्वे आता आठवड्यातून एकदाच धावणार

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हावडा-मुंबई या विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ही गाडी यापूर्वी दररोज चालविण्यात येत होती. परंतु आता आठवड्यातून एक दिवस चालवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

येत्या बुधवारपासून (दि.१५) हावडा-मुंबई अप म्हणजेच हावडा हून मुंबईला जाणारी गाडी ही फक्त बुधवारीच धावणार आहे. प्रत्येक बुधवारी हावडा येथून रात्री ८.०० वा. सुटून शुक्रवारी मुंबईला संध्याकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. त्याचप्रमाने १७ तारखेपासून डाऊन हावडा मेल म्हणजेच मुंबईहून हावडा ला जाणारी गाडी प्रत्येक शुक्रवारी मुंबईहून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटून रविवारी पहाटे हावडा येथे पोहोचेल.

Loading

🔎 हे वाचलं का?:  'सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790