राज्यात पुन्हा पावसाची हजेरी; पुढील चार दिवस जोरदार सरींचा अंदाज

नाशिक। दि. ३ सप्टेंबर २०२६: मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच ईशान्य अरबी समुद्रातील द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्य नाट्य स्पर्धेंसाठी संस्थांनी 25 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

दरम्यान, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी तसेच प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन हवामान प्रणाली सक्रिय झाली असून ती ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे ४ ते १० सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, या कालावधीत विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी स्थानिक हवामान परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790