शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश

नाशिक। दि. २७ एप्रिल २०२६: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या कर्मयोगीनगर येथील ‘रणभूमी ते भामरे मिसळ’ या रस्त्याच्या कामाला अखेर चार वर्षांच्या प्रयत्नानंतर सुरुवात झाली आहे. या रस्त्याचा गायब झालेला निधी महापालिका अधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलनानंतर परत मिळाला होता. मोठी गैरसोय दूर होणार असल्याने नागरिकांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.
विकास आराखड्यात कर्मयोगीनगर ते भामरे मिसळजवळ बडदेनगर पाटीलनगर रस्त्याला जोडणारा हा अठरा मीटर रस्ता आहे. तो विकसित करण्यात यावा, यासाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने सन २०२२ पासून प्रयत्न सुरू करण्यात आले. १९ मे २०२२ ला पहिले निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले. त्यानंतर सतत चार वर्षे हे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे.
मार्च २०२३ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सव्वाकोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सततच्या पाठपुराव्यानंतर १४ डिसेंबर २०२४ ला या कामाची निविदा काढण्यात आली, ती उघडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या कामासाठी कंत्राटदार निश्चित करण्यात आला. असे असताना आणि सन २०२३-२४ व सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदीनुसार प्रक्रिया राबविली गेली असतानाही अचानक निधी गायब झाला. महापालिकेने हे काम सुरू करणे थांबविले.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह नागरिकांनी निधी परत मिळविण्यासाठी निवेदने दिली, रास्ता रोको केला. बुधवार, २९ ऑक्टोबर २०२५ ला शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. १२ डिसेंबर २०२५ ला हा निधी परत देण्याचा निर्णय झाल्यानंतर १४ डिसेंबरला रहिवाशांनी आनंदोत्सव साजरा केला.
त्या निर्णयानुसार चालू अर्थसंकल्पात तरतूद कायम ठेवण्यात आली. आठवड्यापूर्वी बॉक्स कल्व्हर्ट अर्थात छोट्या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, विनोद पोळ, दिलीप रौंदळ, दिलीप दिवाने, सतीश कुलकर्णी, सतीश मणिआर, बाळासाहेब राऊतराय, डॉ. शशीकांत मोरे, मनोज वाणी, मीना टकले, वंदना पाटील, निलेश ठाकूर, डॉ. राजाराम चोपडे, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, संदीप कासार, शैलेश महाजन, दीपक दुट्टे, राहुल काळे, संग्राम देशमुख, पंढरीनाथ पाटील, पुरुषोत्तम शिरोडे, हरिष काळे आदींनी महापालिकेचे आभार मानले आहेत.
![]()

