
नाशिक। दि. २७ फेब्रुवारी २०२६: खारघर, मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च, 2026 रोजी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम निमित्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून ओझर विमानतळ येथून मार्गस्थ केले.
खारघर, मुंबई येथे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यकमास जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या 62 व 118 खासगी बसेसमधून भाविक जाणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, माजी आमदार बाळासाहेब सानप, क्षेत्रीय समिती सहअध्यक्ष (बंजारा व लभाना समाज) रवींद्र गांगोले- नाईक, क्षेत्रीय समिती सहअध्यक्ष (शीख समाज) गुरमीतसिंग संधू, धर्म जागरण विभाग, जिल्हा समन्वयक संजय लढ्ढा आदी उपस्थित होते.
![]()

