पंचवटी, जनशताब्दीसह प्रमुख रेल्वे आता १ जुलैपर्यंत रद्द

नाशिक (प्रतिनिधी): प्रवाशांच्या मे महिन्यातील प्रतिसादाची कोणतीही खातरजमा न करता रेल्वेने पुन्हा नाशिक जिल्ह्याची मुंबईशी नाळ जोडणारी जीवनवाहिनी पंचवटी एक्स्प्रेस तसेच मराठवाड्याशी जोडणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेससह राज्यातील प्रमुख प्रवासीप्रिय गाड्या थेट १ जुलैपर्यंत कमी प्रवासी संख्येचे एकतर्फी कारण देत गुरुवारी रद्द केल्या.

यामुळे राज्यातील लॉकडाऊन १५ मेपर्यंत असला तरी रेल्वेने मात्र तो एकतर्फी १ जुलैपर्यंत वाढविल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांत संतापाची लाट पसरली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत तातडीने लक्ष घालावे, अशी प्रवाशांची मागणी आहे

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here