नाशिक, दि. ५ जून २०२५: अकरावी प्रवेशासाठी गुरुवारी (दि. ५) नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मुदतवाढ दिल्यानंतर संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण सुरू होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही. गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
दोनवेळा स्थगित झाल्यानंतर अखेर अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला करण्यात आला होता. राज्य शिक्षण मंडळाने यापूर्वी २१ तारखेपासून अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले होते. मात्र, पहिल्याच दिवशी मंडळाची वेबसाइट ठप्प झाल्याने त्याच दिवशी अकरावी प्रवेशप्रक्रिया स्थगित करावी लागली.
दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता वेळापत्रक जाहीर होईल, असे जाहीर झाले असताना प्रत्यक्षात सायंकाळी सहा वाजता वेळापत्रक जाहीर झाले. त्या वेळापत्रकानुसार पहिल्या दिवशी तरी वेबसाइट सुरळीत सुरू असून राज्यात सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ८७ हजार ६५३ विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले असून, अकरावीच्या ८९ हजार १६० जागा उपलब्ध आहे.