नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक राज्यभरात बुधवारी (दि.१९) मुंबई, ठाण्यासह कोकणातील पालघर, रायगड जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार असून यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून नाशिकसह उर्वरित ठिकाणी हलक्या ते मध्यम पावासचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.
राज्यात मंगळवारी अगदीच तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस झाला. आगामी चार दिवस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल. १९ व २२ जून रोजी पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात तर मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राज्यात उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सूनची वाटचाल जळगाव जिल्हा आणि विदर्भात थबकली आहे. पावसाचा अंदाज बघून शेतकऱ्यांनी पेरणीचे वेळापत्रक तयार करावे असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.