उत्तरेकडील गार वाऱ्यांमुळे राज्यात वाढणार गारठा; किमान तापमानात 3 अंशाने होणार घसरण

नाशिक (प्रतिनिधी): ढगाळ वातावरणानंतर आकाश स्वच्छ व निरभ्र झाल्याने किमान तापमानात घसरण होत असून आगामी दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच आकाश निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता देखील वाढली आहे.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

राज्यात पावसाळी वातावरण दूर झाले आहे. तसेच उत्तर भारतात धुके कायम असून आगामी चार दिवस दाट धुके राहण्याचा अंदाज हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तसेच उत्तरेकडील वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता आहे.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

निवडक शहरातील किमान तापमान:
माथेरान २१, धाराशिव १९, पुणे १४, परभणी १७, जळगाव १७, अहमदनगर १५, नाशिक १५.४, नांदेड १८, सोलापूर २१, छत्रपती संभाजीनगर १५, महाबळेश्वर १६.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here