नाशिक: कमी दाबाने पाणी येत असल्याने पंचवटीकरांची पाण्यासाठी वणवण

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतांना शहरातील बहुतांशी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.गणेशवाडीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना वणवण करावी लागत आहे. इमारतीमध्ये पाणी वर चढत नसल्याने महिलांना हंडे घेऊन जिन्यावरून जीव मुठीत धरून जावे लागत आहे. पहाटे पाणी सोडले जात असल्याने बहुतांशी नागरिकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे पाणी सोडण्याची वेळ बदलावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पंचवटी भागातील गणेशवाडी, कृष्ण नगर या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

Loading

⚡ हे ही वाचा:  नाशिक: हॉटेल गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीचा फरार संशयित जेरबंद

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here