जिल्हा बँकेच्या सक्तवसुली मोहिमेला पालकमंत्र्यांकडून ब्रेक !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हा बँकेकडून सुरु करण्यात आलेल्या सक्तीच्या वसुली मोहिमेला आणि मालमत्ता लिलाव प्रक्रियेला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रेक लावला आहे. कोरोनाच्या या संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे बँकेने सक्तीची वसुली मोहीम थांबवावी असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

शेतकरी वर्गाकडून या सक्तीच्या मोहिमेबद्दल वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. आर्थिक अडचणीत असतानाही बँक वसुलीसाठी तगडा लावत आहे अशी शेतकऱ्यांची नाराजी होती. त्यानुसार त्यांनी पालकमंत्र्यांकडे दाद मागितली होती.त्यानुसार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सदरचे आदेश दिले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790