नाशिक (प्रतिनिधी): पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आंबिया बहार सन 2024-25 मध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, काजू, आंबा, स्ट्रॉबेरी या 6 फळ पीकांसाठी हवामान धोक्याच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी 25 एप्रिल 2025 पर्यंत फळपीकांची ई-पीक पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पुर्नरचित हवामानावर अधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे परंतु फळ पीकांची ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी ती 25 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करावी अन्यथा 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णय मधील तरतुदीनुसार 7/12 उताऱ्यावर ई-पीक पाहणी नोंद नसलेले सर्व पीक विमा अर्ज रद्द करण्यात येतील. या बाबतीत सविस्तर माहिती शासन निर्णयात नमूद केलेल्या आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790