नाशिक: गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात झाली वाढ; धरणसाठा ४६ टक्क्यांवर

नाशिक । दि. 17 मे 2025: जिल्ह्यातील धरण समूहात अवघा ३३.६२ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक राहिला असून ग्रामीण भागांत काही ठिकाणी टँकरची संख्याही १३० वर पोहोचली आहे. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४६.४१ टक्के (२,६१३ दलघफू) पाणी शिल्लक आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे गंगापूर धरणात पाणी वाढले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Loading

👉 हे ही वाचा:  राज्यातील मुसळधार पावसाने घेतली विश्रांती; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790