नाशिक: चारचाकीच्या धडकेत १७ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): कलानगर ते वडाळा दरम्यान भरधाव वेगातील चारचाकीने धडक दिल्याने सायकलस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.

धर्मेद्र प्रकाश बिशी (१७ रा.पदमा अपा.बापू बंगल्याजवळ) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चारचाकी चालकाविरूधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर बाळासाहेब कर्डीले असे संशयित चारचाकी चालकाचे नाव आहे.

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज (दि. १० जुलै) पावसाचा इशारा !

याप्रकरणी हवालदार किशोर खरोटे यांनी तक्रार दाखल केली आहे. इंदिरानगर परिसरातील धर्मेद्र बिशी हा शाळकरी मुलगा गेल्या मंगळवारी (दि.११) सकाळी कलानगरकडून वडाळाच्या दिशेने आपल्या सायकलवरून जात असतांना हा अपघात झाला होता.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

वडाळारोडने भरधाव जाणा-या संशयिताच्या चारचाकीने सायकलीला धडक दिली होती. या अपघातात धर्मेंद्र बिशी हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला होता. सोमवारी (दि.१७) उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास जमादार साळी करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790