नाशिक: गंगापूर धरणातून गोदावरी पात्रात ६९८ क्युसेकने विसर्ग

नाशिक। दि. २५ ऑगस्ट २०२५: गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने रविवारी (दि.२४) सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून गोदा नदीपात्रात ६९८ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. २० ते २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या आठवड्यापासून पावसाचे शहर व जिल्ह्यात पुनरागमन झाले. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ९७ टक्के भरले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाच्या संततधारेमुळे विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवला जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. नदीकाठचे नागरिक, विक्रेते यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, यंदा वरुणराजाच्या कृपेमुळे नाशिकमधून तब्बल ५३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहोचले आहे. त्यामुळे मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here