नाशिक: आचारसंहितेबरोबरच शहरात पंधरा दिवस मनाई आदेश

शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कार्यवाही

नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच वेगवेगळ्या पक्षामध्ये फूट पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये तणाव आहे. आरक्षणसाठी धरणे, मोर्चे काढण्याची शक्यता असल्याने २१ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत शहरात

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. या कालावधीत कोणतेही स्फोटक पदार्थ, शस्त्रे, बाळगण्यास, प्रतिकात्मक पुतळे दहन, प्रदर्शन, घोषणा देणे, वाद्य वाजविल्यास सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल असे वक्तव्य, आवेशपूर्ण भाषण करणे, अविर्भाव करण्यास सक्त मनाई असणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आदर्श आचार संहिता कालावधीत 'हे' निर्बंध राहतील लागू !

पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमण्यास पोलिस आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790