राज्यात आज (दि. ७) मुसळधार पावसाचा इशारा! जाणून घ्या कुठल्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…

मुंबई। दि. ०७ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्रात कमी दाब क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे पावसाच्या सरींना वेग आला आहे. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन झाले असून, आज (७ सप्टेंबर) पालघर आणि नाशिक घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार आणि पुणे घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. ८) विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

हवामान तज्ज्ञांचे निरीक्षण:
दक्षिण राजस्थान परिसरावर कमी दाबाचे केंद्र निर्माण झाले असून, त्याला लागून चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीची तीव्रता वाढल्याने राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनाऱ्यापासून राजस्थानपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर बंगालच्या उपसागरालगत ओडिशा-आंध्र प्रदेश किनाऱ्यापर्यंत समुद्रसपाटीपासून वर चक्राकार वारे दिसून येत आहेत.

⚡ हे ही वाचा:  सप्टेंबर उजाडला, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार? मोठी अपडेट…

कुठे कोणता अलर्ट?
ऑरेंज अलर्ट :
पालघर, नाशिक घाटमाथा
येलो अलर्ट (जोरदार पाऊस) : मुंबई, ठाणे, रायगड, नंदूरबार, पुणे घाटमाथा
येलो अलर्ट (विजांसह पाऊस) : छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, गडचिरोली

⚡ हे ही वाचा:  राज्यात ११ सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान व पावसाच्या सरी कायम राहणार असून, नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790