दहावी, बारावीची परीक्षा कधी ? बोर्डाकडून तारखा जाहीर!

पुणे। दि. १४ ऑक्टोबर २०२५: इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दोन्ही परीक्षांच्या तारखा सोमवारी जाहीर करण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षाही याच कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात उष्णतेचा कडाका आणि वादळी पावसाचा इशारा

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाईल. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. शरीरशास्त्र, आरोग्य शास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही याच कालावधीत घेतल्या जाणार आहेत. विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790