नाशिक: मारहाण करत विनयभंग करणाऱ्या चौघांना कारावास

नाशिक (प्रतिनिधी): वाहनाच्या तोडफोडीप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या एका महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना २०२२ साली अंबड पोलिसांच्या हद्दीत घडली होती.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची अंतिम सुनावणी गुरुवारी (दि.३०) पार पडली. न्यायाधीश मनिषा कुलकर्णी यांनी चौघांना दोषी धरले. दोन वर्षे ५ महिन्यांचा साधा कारावास व ५० हजारांचा दंडाची शिक्षा ठोठावली.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

चुंचाळे शिवारात आरोपी उद्धव उर्फ टकल्या अशोक राजगिरे (२०), लक्ष्मण उर्फ लक्ष्या राजेंद्र कोळी (२०), भूषण सुरेश सिंग (३३) व आदित्य उर्फ आद्या देवानंद पांडे (२०, चौघे रा. चुंचाळे घरकुल प्रकल्प) यांनी परिसरात आरडाओरड करत वाहनांची तोडफोड केली होती. पीडित फिर्यादी महिलेने त्यांना यावेळी विरोध केला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

यामुळे या चौघा आरोपींनी पीडितेचा विनयभंगाच्या करून तिला मारहाण केली, तसेच तिच्या मुलाला धमकावले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here