नाशिक (प्रतिनिधी): निर्बंध शिथिल केले याचा अर्थ लॉक डाऊन पूर्ण उठला आहे असे नाही असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.. ते म्हणतात..
नाशिक शहर व जिल्ह्यातील रुग्ण संख्या विचारात घेता आपण दिनांक 12 मे पासून काही निर्बंध कठोर केले होते. त्यानंतर रुग्ण संख्या चांगल्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे आपण स्थानिक स्तरावर कठोर केलेले निर्बंध दिनांक 23 मे रात्री बारा वाजल्यापासून शिथिल करत आहोत. परंतु याचा अर्थ लॉक डाऊन पूर्ण उठला आहे असे नाही.
आपल्या जिल्ह्यात जे निर्बंध दिनांक 12 मे पूर्वी राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार लागू होते ते निर्बंध तसेच पुढे चालू राहणार आहेत व त्याआधी सूचनेची प्रभावी अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातून पूर्ण लॉक डाऊन उठला आहे अशा गैरसमजात कोणी राहू नये. सर्वांनी पूर्वीच्या सर्व निर्बंधांचे यथोचित पालन करावे.
आपण मोठ्या प्रयासाने रुग्ण संख्या कमी केली आहे. परंतु आता पुन्हा निर्बंधांचे उल्लंघन केल्यास ती वाढायला वेळ लागणार नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790