वादग्रस्त स्मार्ट बससेवेला ब्रेक; जूनपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्याबाबत असलेले निर्बंध लक्षात घेत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी वार्षिक ३५ कोटी तोटा असलेल्या वादग्रस्त स्मार्ट बससेवेला ब्रेक लावत त्या जूनपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चनंतर शाळा व महाविद्यालय जूनपर्यंत बंद रहात असल्यामुळे प्रवासी मिळणार नाही. उगाच पालिकेच्या तिजोरीवर भार नको या विचारातून महापालिका आयुक्त जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Loading

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here