नाशिक (प्रतिनिधी): खाद्यतेल हे जीवनावश्यक वस्तूंपैकी एक आहे. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत स्वयंपाकासाठी महत्वाचे असणारे खाद्यतेल व त्याचे वाढते दर हे लोकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे खाद्यतेलाच्या भाववाढीने शेतकरी व व्यापारी यांना नफा होत नसून हा भडका केंद्रसरकारच्या भरमसाठ आयात शुल्कामुळे उडाला असल्याचे आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहेत.
भारत हा आधीपासून खाद्यतेल आयात करणारा देश असून खाद्यतेलावर ४ टक्के आकारले जाणारे आयात शुल्क आता २३ टक्क्यांपर्यंत केले गेले असून, जे देश यापूर्वी निर्यात अनुदान देत होते त्यांनी देखील ५ टक्के निर्यात कर आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खाद्यतेल महागाईला पूर्णपणे केंद्र सरकारची करवाढ जबाबदार असल्याचे समोर येत आहे. दिवाळी, लग्नसराई व हॉटेल्स पुर्ववत सुरु झाल्याने तेलाची मागणी वाढली व यामुळे महागाई अजूनच पेटली. एकतर विदेशातून आयात होणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवरील कर वाढले कि,याचा थेट परिणाम स्वयंपाकघरापर्यंत होत असतो.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790