LPG

ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता…

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याची नोंद झाली असून, लवकरच महाराष्ट्रात थंडीची परतफेरी होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज (दि. ३ नोव्हेंबर) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

हवामान खात्याचा इशारा:
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीप्रमाणे, आज कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, आणि सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अचानक आलेल्या ढगाळ हवामानामुळे या भागातल्या नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये विशेषतः सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन

ढगाळ हवामानामुळे थंडीचा प्रभाव कमी:
ढगाळ वातावरणामुळे थंडीचा प्रभाव घटला आहे. राज्यातील थंडी काही काळासाठी गायब झाली असली तरी पुढील काही दिवसांत पुन्हा थंडी परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ढगाळ वातावरणाचा प्रभाव कमी झाल्यानंतर थंडीचं प्रमाण वाढू शकतं. विशेषतः पुणे, नागपूर, नाशिक आणि कोकणातील काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790