नाशिक शहरातील संभाव्य पाणीकपात तूर्तास टळली…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नसून मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केले आहे.

नाशिक शहरात महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर,गौतमी व कश्यपी या समूह धरणांमधून शहरात पाणीपुरवठा केला जात असतो सध्याची गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेऊन पाणी कपातीबाबतच्या निर्णयाच्या  दृष्टीने गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची पाहणी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या समवेत सभागृहनेते सतीश सोनवणे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता एस एम चव्हाणके, अविनाश धनाईत,पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी केली.यावेळी धरणातील पाण्याचा साठा गंगापूर धरणात समूह धरणांमधून जमा होणारे पाणी याबाबतची सविस्तर माहिती महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी घेतली.

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकार देवरेकडे कोट्यवधींची माया; एसआयटी पथक करणार तपास !

तसेच सध्याचा पाणीसाठा उपलब्ध असणारा पाणीसाठा व असणारी आवश्यकता याची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली धरणात सध्याच्या परिस्थितीत ४७ टक्के इतका पाणी साठा असून तो साठा पुरेसा असल्याने नाशिक शहरात सध्याच्या परिस्थितीला पाणी कपात केली जाणार नसून मात्र शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी पाहणीच्या सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790