दुर्दैवी: धुळवड साजरी करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या महिलेचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): कश्यपी धरणावर धुळवड साजरी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
आज (दि. १८ मार्च) रोजी ही दुर्दैवी घटना घडली.
दोन महिला आणि दोन पुरुष गिरणारे गावाच्या पुढे असलेल्या कश्यपी धरणावर धुळवड खेळण्यासाठी गेले होते.
धुळवड खेळत असतानाच धरणाच्या एका पाण्याने भरलेल्या खड्ड्यात महिला उतरली.
पाण्याचा अंदाज न आल्याने ही महिला पाण्यात बुडाली. यानंतर तिच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केला तसेच या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महिला नजरेस न पडल्याने याबाबतची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आली.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10201,10207,10203″]
यानंतर तत्काळ अग्निशमन विभागाने शोधमोहीम राबविली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांच्या अंती महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. योगिता राजेश कांबे (वय ३० रा. नाशिकरोड) असे या महिलेचे नाव असून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी या महिलेचा मृतदेह आणण्यात आला आहे. खड्ड्यात ही महिला उतरली होती. खोल असल्यामुळे ही महिला बुडाली. त्यातच पोहोता येत नसल्याने या महिलेचा बुडून मृत्यू झाला. कोरोनाचे निर्बंध काही अंशी काढल्यानंतर पर्यटन स्थळांवर गर्दी वाढत आहे. पण असं असलं तरी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे.